मातृवात्सल्यविंदानम

कलम ३:
मातृवात्सल्यविंदानम एक पारायण पद्धती आहे आणि आपण रेग्युलर पण वाचू शकतो. मातृवात्सल्य उपनिषद मी पूर्ण मोकळं ठवलंय. तुम्हाला पाहिजे तो अध्याय पाहिजे तितक्या वेळा वाचा. कुठल्याही क्रमाने वाचा. कसाही वाचा. ज्या स्त्रिला किंवा पुरुषाला अशी भिती वाटत असेल की आपल्यावर दुसरा पुरुष किंवा आपल्यापेक्षा बलवान व्यक्ती बलात्कार करू शकते, त्यांनी मातृवात्सल्य उपनिषद मधले शिवगंगागौरीचे २ अध्याय जे आहेत, त्यांचं एकदा जरी पठण केलं आणि त्यानंतर माता शिवगंगागौरीला सांगितलं की मला अशा, अशा व्यक्तीकडून भिती वाटते, तर त्याचं हे भय ताबडतोब नाहीसं झालेलं असेल कारण भयाचं कारणच नाहीसं झालेलं असेल, भितीचं कारणच उरणार नाही.

कलम ४:
आम्हाला मंत्र म्हणता येत नाही, तर काय करायचं ? ज्यांचं शिक्षण झालेलं नसेल, ज्यांना लिहीता वाचता येत नसेल, किंवा जीभ बोबडी असल्यामुळे नीट बोलता येत नसेल, किंवा आम्ही मुके आहोत, तर मनातल्या मनात फक्त ‘अनिरुद्ध, अनिरुद्ध, अनिरुद्ध’ एवढं म्हटलत तरी ही सगळी कामं, म्हणजे हे वाचन, पठण मी एकटा तुमच्यासाठी करीन आणि त्याचं फळंही तुमच्यापर्यंत आणून पोहोचवीन हे माझं प्रॉमिस आहे.

कलम ५:
अहिल्या संघ, बल ग्रुप आणि चण्डिका आर्मी जी आपण स्थापन केलेली आहे, त्यातील सर्व स्त्रियांना मी सांगतो की अहिल्या संघामध्ये मी तुम्हाला असं टेक्नीक देईन, की कोणी तुम्हाला हात लावायला आला, तर तुम्ही अवघ्या ५ सेकंदात जागच्या जागी त्याला कायमचा नपुंसक बनवलेला असेल. तुमचं वजन ३० किलो असलं, तुम्ही नुकत्या तापातून उठलेल्या असाल, तुमच्यात दोन कदम चालायची पण ताकद नसेल, तरी सुद्धा तुम्ही हे करू शकाल ही गॅरंटी मी तुम्हाला देतो.

॥ हरि ॐ॥ कल श्रीहरिगुरुग्राम में हुए प्रवचन में, श्रीअनिरुद्धजी ने भारत में हाल ही में हुईं कुछ घटनाओं पर भाष्य किया; जिन घटनाओं के कारण सारा भारत हिल गया था, दहल गया था| हर एक समझदार और संवेदनशील भारतीय नागरिक इन घटनाओं  से व्यथित हो गया| बापु ने अपने इस प्रवचन में अपने सभी श्रद्धावान मित्रों को एक आश्‍वासक दिलासा दिया| बापु के इस प्रवचन का महत्त्वपूर्ण ‘आश्‍वासक’ भाग

आश्‍वासक बापू (Bapu's reassurance and care)

ll हरि ॐ ll  कालच्या श्रीहरिगुरुग्राम येथील आपल्या प्रवचनात, श्रीअनिरुद्धांनी भारतात नुकत्याच घडलेल्या काही घटनांवर भाष्य केलं; ज्या घटनांमुळे अख्खा भारत हादरून गेला, ढवळून निघाला. प्रत्येक सुज्ञ आणि संवेदनशील भारतीय नागरीक ह्या घटनांनी व्यथित झाला. बापूंनी त्यांच्या ह्या प्रवचनामध्ये त्यांच्या सर्व श्रद्धावान मित्रांना एक आश्वासक दिलासा दिला. बापूंच्या ह्या प्रवचनातील महत्त्वाचा ‘‘आश्वासक’’ भाग ह्या ब्लॉगपोस्टबरोबर खाली देत आहे. ‘‘गेल्या तीन चार दिवसांमध्ये, विशेषत: गेल्या आठवड्यामध्ये टी.व्ही. चॅनल्स, पेपर्समधून आम्ही बघत आहोत