इंग्रजी शिकण्यासाठी नंदाईंनी लिहिलेल्या पुस्तकांच्या प्रकाशनाच्या वेळी स्‌दगुरु बापूंनी केलेले भाषण

इंग्रजी शिकण्यासाठी नंदाईंनी लिहिलेल्या पुस्तकांच्या प्रकाशनाच्या वेळी स्‌दगुरु बापूंनी केलेले भाषण

English    ગુજરાતી      తెలుగు     ಕನ್ನಡ     தமிழ்    

मला खात्री आहे की आतापर्यंत तुमच्यापैकी बहुतांश लोकांना माहीत झालं असेल की रविवार, दि. २५ ऑगस्ट २०१३ रोजी परमपूज्य बापू, नंदाई व सुचितदादांच्या उपस्थितीत, ’हॅपी इंग्लिश स्टोरीज’ ह्या सिरीज अंतर्गत स्वत: नंदाईंनी लिहिलेल्या ’साई फॉर मी’ ह्या पुस्तकांचा पहिला संच एका भव्य प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने प्रकाशित झाला. नंदाईंच्या आत्मबल वर्गांमध्ये वरिष्ठ शिक्षिका व कार्यकर्ता सेवक म्हणून काम पाहणार्‍या श्रीमती दूर्गावीरा वाघ ह्यांच्या हस्ते ह्या पुस्तकांचे प्रकाशन झाले. ही पुस्तकं प्रकाशित करण्यामागे, नवशिक्या लोकांबरोबरच, ज्यांचे इंग्रजी भाषेवर बर्‍यापैकी प्रभुत्व आहे, अशा लोकांचीसुद्धा बोलीभाषा व लिखित भाषा सुधारण्याचा हेतू ठेवण्यात आला आहे. 

ह्या पुस्तकांच्या प्रकाशनाच्या निमित्ताने ’बुक्शनरी पब्लिशिंग हाऊसने’ प्रकाशन क्षेत्रात दिमाखात प्रवेश केला आहे. बुक्शनरी पब्लिशिंग हाऊसतर्फे पुस्तकांच्या स्वरूपात चांगल्या प्रतीचे, वैविध्यतेने भरलेले वाङमय उपलब्ध होईलच; शिवाय पुढील काळात सीडी, डीव्हीडी, ई-बुक्स व इतर आधुनिक सुविधा वापरून विविध विषयांवर वाचकसमुदायास उपयुक्त ठरेल अशा स्वरूपात वाङमय उपलब्ध होणार आहे. 

’रामराज्य’ ह्या विषयावर दृष्टीक्षेप टाकताना, बापूंनी ६ मे २०१० रोजी झालेल्या प्रवचनात अनेक प्रापंचिक व आध्यात्मिक मुद्दे मांडले होते ज्यांना वैयक्तिक स्तरावर, आप्त स्तरावर, सामाजिक स्तरावर, धार्मिक स्तरावर व जागतिक स्तरावर प्रत्यक्षात आणावयाचे आहे. त्यामध्ये बापूंनी एका खूप महत्त्वाच्या मुद्यावर आपल्या सर्वांचे लक्ष केंद्रित केले होते, ते म्हणजे संपर्क साधण्यासाठी ’चांगल्या प्रकारे इंग्लिश भाषेत बोलायला शिकणे’. 

आज जगाच्या व्यवहारामध्ये इंग्रजी भाषा ही संपर्कव्यवस्थेसाठी सर्वात जास्त वापरण्यात येणारी भाषा आहे. आजच्या घडीला कुठलाही व्यवहार करण्यासाठी संपर्कव्यवस्था ही चोख असावीच लागते. त्यामुळे आज ना उद्या लोकांसाठी इंग्रजी भाषेशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही. आज इंग्रजी ही बोली भाषा नसणार्‍या देशांमध्येही मोठमोठ्या बॅनरच्या कंपन्यांनी इंग्रजी भाषेशी जुळवून घ्यायला कधीच सुरुवात केली आहे. आमची इंग्रजी भाषा ही जर ओघवती नसेल, तर आमचा जगाच्या व्यवहारामध्ये टिकाव लागणार नाही; मग भले आमच्याकडे कितीही मोठ्या डिग्री असतील. आज सॉफ्टवेअर प्रोग्रॅमिंग क्षेत्रात भारत चीन पेक्षा सरस ठरतोय त्याचे कारण हेच की भारतीय प्रोग्रॅमर्सचे चिनी माणसांपेक्षा इंग्रजी भाषेवर जास्त प्रभुत्व आहे. 

२००५ साली दैनिक ’प्रत्यक्ष’ जेव्हा पहिल्यांदा प्रकाशित झाला, तेव्हा बापूंनी स्पष्टपणे सांगितले होते की बदलत्या काळातील परिस्थितीशी अनभिज्ञ असणे म्हणजे अंधारात जगण्यासारखे आहे आणि अंधार हा नेहमीच घातक असतो. त्याने आपले जीवन उद्ध्वस्त होऊ शकते. म्हणूनच सर्व श्रद्धावानांच्या भल्यासाठी डॉ. (सौ.) नंदा अनिरुद्ध जोशींनी (आपल्या लाडक्या नंदाईंनी) इंग्रजी भाषा शिकण्यासाठी, सुधारण्यासाठी आणि फुलवण्यासाठी ह्या पुस्तकांचा संच प्रकाशित केला आहे. ह्या पुस्तकांची आखणी अशा प्रकारे केली गेली आहे की नवशिक्या माणसाला ती समजण्यासाठी सोपी आहेतच, शिवाय रोजच्या व्यवहारात त्यांचा वापर करणेही सुलभ होणार आहे. ज्यांचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व आहे, अशा लोकांसाठीसुद्धा ही पुस्तकं उपयुक्त ठरणार आहेत. 

ही पुस्तकं श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम येथे विक्रीसाठी उपलब्ध आहेतच; शिवाय इच्छुक श्रद्धावान www.aanjaneyapublications.com ह्या साईटवरही पुस्तकं ऑर्डर करू शकतात.

Published at Mumbai, Maharashtra - India